कराओके गीतगायनातील ठाण्याचा रविंद्र तरे महाराष्ट्राचा महागायक तर उपविजेता छत्रपती संभाजीनगरचा सिराज पठाण !

शालेयवृत्त सेवा
0

 

ताण तणाव कमी करण्यासाठी शिक्षकांनी आपली आवड जोपासावी -शिक्षणाधिकारी बनसोडे

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचा उपक्रम !


विभागातून प्रथम हर्षल साबळे ( कोकण ) नंदकुमार उबाळे ( पुणे ) प्रीती भरणे ( अमरावती ) सुवर्णा केळगिरे ( मराठवाडा ) सुनील सिसोदे ( नाशिक ) घनशाम मेश्राम ( नागपूर )



 नांदेड / श्रीक्षेत्र माहूर ( शालेय वृत्तसेवा ) :

        "धकाधकीच्या जीवनात स्वतःची आवड छंद जोपासायला आपल्याला वेळ मिळत नाही तरी आपण वेळ काढून आपली आवड छंद जोपासली पाहिजे. ताण-तणाव कमी करण्यासाठी संगीत महत्वपूर्ण आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपली कला जोपासली पाहिजे"असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी केले आहे. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (रजि) मराठवाडा विभागाच्या वतीने आयोजित शिक्षकांचा राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी येथील ते बोलत होते. 



          मंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव हर्षल साबळे, नागपूर विभागाचे अध्यक्ष नरेंद्र कन्नाके, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, सरफराज दोसांनी, बालाजी कोंडे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलित केल्यानंतर 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक मराठवाडा विभागाचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी केले. सुत्रसंचालन नांदेड जिल्हा सरचिटणीस रुपेश मुनेश्वर केले तर आभार मराठवाडा विभागाचे सचिव शेषराव पाटील यांनी केले.



         महाराष्ट्राचा महागायक म्हणून ठाणे जिल्ह्यातील शिक्षक रवींद्र तरे हा ठरला तर राज्यातून दुसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षक शिराज पठाण तर तिसरा क्रमांक सिद्धार्थ वाघ यांनी पटकावला. उत्तेजनार्थ विलास नरवाडे ( नांदेड ) रजनी गोडबोले ( ठाणे ) संतोष चलोदे ( रत्नागीरी ) मुन्ना थोरात ( नांदेड ) निलेश दोनाडकर ( चंद्रपूर ) यांना मिळाला आहे. तर विभागीय प्रथम हर्षल साबळे ( कोकण ) नंदकुमार उबाळे ( पुणे ) प्रीती भरणे ( अमरावती ) सुवर्ण नळगिरे ( मराठवाडा ) सुनील सिसोदे ( नाशिक ) घनशाम मेश्राम ( नागपूर ) यांना मिळाला आहे. परीक्षक म्हणून संगीततज्ञ राजू जाधव, संगीत विशारद सुरेश पाटील, गायन विशारद भारत कोडापे यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले. सहभागी सर्वांनाच सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन फाल्गुनी उपरीकर यांनी केले तर आभार माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे यांनी मानले. 



         श्री.आनंद दत्तधाम आश्रमात संपन्न झालेल्या स्पर्धेचा महाअंतिम सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे, किरणकुमार वाघमारे, मनोज बारसागडे, बाबुराव माडगे, सुधाकर चवटे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे पाटील, मुन्ना थोरात, प्रवीण वाघमारे, सुरेशकुमार शेरे, सागर चेक्के, भाग्यवान भवरे, शितल गौरखेडे, डॉ. अरुण धकाते, प्रा. विनोद कांबळे, जितेंद्र वर्मा, रामस्वरूप मडावी, यु.टी.पवार, पांडुरंग शेरे आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या सौजन्याने उपस्थित सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. शेवटी कभी ' अलविदा ना कहेना.. या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)