शिवाजी महाराज! असे उच्चार 'जय' हे जयघोषी जयजयकार आपल्या अंतःकरणातून आपसूक निघतो. हे इथल्या महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे वैभव आहे. 'हर हर महादेव' ही मावळ्यांची रणगर्जना होती. ती फक्त मराठी संबंध आणि संबंध मराठी मुलखात बाहेरही दुमली होती. हे मराठी अठरापगड जातीचे होते. या मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपला शेवटचा श्वास पणाला लावला होता. प्राणांची बाजी लावली होती. पराक्रमाची शिकस्त केली होती. या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का लागू दिला नाही. आपणच निर्माण केलेले स्वराज्याचे पाणी सिंचले. जपले. राजमाता जिजाऊंनाही
जपले. त्यांचे आदेश पालन केले. आपली व आपल्या कुटुंबाची परवा न करता ते रणमैदानात उतरले. काव्याने शत्रुला नामोहरम केले. संकटाला घाबरून नता महाराजांचा भक्ती आणि बुद्धी जोरावर एकजुटीने सामना केला. स्वराज्य निर्माण करणे हे काही येराबालांचे कामच आहे. ते शुरविरांचे, पराक्रमाचे, स्वार्थासाठी स्वतःला झोकून पिढ्यानपिढ्याना प्रेरणा देव विश्व धाडवय्यांचे विश्वसदर्य होते. निबिड अंधाराला फाडून सूर्यतेज पसरवणारे ते इतिहास घडवणारे होते. गुलामीची व्यक्ती कोसो दूर या मातीची विजयी ओळखून विस्तीर्ण आभाळात अभिमानाने फडकविंचे ते शाश्वत संविधान होते.
रायराच्या स्वराज्याची शपथेश्वर घेत शहा मंदिराच्या पोराने आपल्या हलक्या जातीची पोरं जमविल असा जातीय प्रश्न केला. पण हे हलक्या जातीची पोरं शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवजंतू सज्ज होते. अत्यंत धावपळीच्या शिवाजी महाराजांचा जन्म. त्या देशाच्या जिजाऊंच्या स्वराज्याचा जन्म झाला. शिवराय बालपण आणि शिक्षण जससे बाळसे धरत होते तसतसे स्वराज्याची संकल्पना अधिकाधिक दृढ होत होती. शहाजीके आदिलशाहीची चाकरी गुंतले होते, मात्र या परकियांची गुलामीराज करीत होते साधारण मराठी सरदारांची चीड आगीचे रुप. मावळे खूप कष्टाळू, इमानी, काटक, चपळ शब्दव्ये योद्धे होते. केवळ सहजतानी राजवट खर्ची पडत होती. मराठी मुलखावर राज्य करत आहेत या राजवटी अत्यंत क्रूर. त्यांना त्यांचे, त्यांच्या प्रश्नांचे काही देणे शास्त्र. स्वप्नाचे दुःख दूर करणे योग्य. महाराष्ट्राच्या चोहोबाजूंनी सर्व राजवटी युद्धपिपासू आहेत. अनेक मराठी कुटुंबे देशोधडीला लागतील. मराठी मुलखाची अक्षरशः धुळधाण होत होती. सुलतान जुलमी अत्याचारी शाहूची कृतज्ञता पुकारून दुःखी आनंदासाठी काही इच्छा माँ जि शिवबात पेरली. यासाठीच तमाम मावळ्यांची फौज उभी करण्यात आली होती. इथे जाती पातीचा विचार. श्रेष्ठ कनिष्ठतेची श्रेणी. त्यांचे एकच ध्येय होते - स्वराज्य!
शिवरायांच्या काळात जातीयवाद नव्हता असे नाही. तो होताच. अगदी प्रखर होता. धर्माचे अधिष्ठानही तितकेच प्रबळ होते. अशाही परिस्थितीत अस्पृश्य, व्यवस्थेतील बारा बलुतेदार किंवा आदिवासी जाती जमातीतीलच नव्हे तर मुसलमानांतूनही जिवाला जीव देणारे मावळे शिवरायांनी स्वराज्याला जोडले. स्वराज्याच्या सैन्यात जातिभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. यांतील प्रत्येक मावळा आपल्यासारखाच माणूस आहे ही जाणीव त्यांनी प्रत्येकाला करुन दिली. ते माणसाचे मन जिंकून घेण्यात पटाईतच होते. त्यामुळे तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. स्वराज्याच्या मंत्राने सगळ्यांनाच भारले होते. शिवरायांसाठी जगायचे आणि स्वराज्यासाठीच मरायचे असे ते मानू लागले होते. कारण हिरे माणसं शोधणे आणि त्यांना आपलेसे करणे ही तर शिवरायांची खासियतच! मावळखोऱ्यातील सत्तालोलुप देशमुख मंडळींना सकल मराठी मुलखाची गरज समजावून सांगितली. मराठ्यांची शक्ती वाया जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एकेक मावळा स्वराज्याच्या ध्येयाने कसा झपाटलेला आहे आणि तुम्ही काय करताय हे शिवरायांनी ह्या वतनदारांना पटवून दिले. आपापसांतील वैरभाव संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दांडगाई करणाऱ्या देशमुखांना सरळ केले. अशा रीतीने बारा मावळखोऱ्यांतील मावळ्यांची फौज उभी राहिली. स्वराज्य आता जगण्याची गरज बनली. स्वराज्याला एक नवी भाषा हवी होती. आपली एक राजमुद्रा हवी होती. दुसऱ्या धर्माचा द्वेष न करणारा स्वतःचा कल्याणकारी धर्मही हवा होता. शिवरायांच्या मनातले हे स्वराज्याचे नितीधोरण मावळ्यांच्या लक्षात आले. लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी स्वराज्याचे तोरण लवकरच बांधायचे आहे हे मावळ्यांनी हेरले.
मावळ्यांसाठी स्वराज्यनिर्मितीचे कार्य सहज सोपे कदापिही नव्हते. ते अनेक संकटांनी भरलेले होते. हा मार्ग अत्यंत खडतर होता. त्याकाळी महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्दी यांची हुकुमत होती. यांच्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करायचे होते. यांचा दराराच अधिक भयंकर होता. या सत्तांच्या विरोधात उभे राहण्याची काय तोंडातून साधे 'ब्र' काढायची कुणाचीही हिम्मत नव्हती. ती हिंमत शिवरायांनी आणि मावळ्यांनी केली होती. बळ कमी होते पण निश्चय अढळ होता. सर्वप्रथम स्वराज्याला किल्यांची आवश्यकता होती. किल्ले नसतील तर स्वराज्य कसे असणार? अशी परिस्थिती त्या काळी होती. ज्याच्याकडे किल्ला त्याची सत्ता हेच समीकरण होते. त्यामुळे स्वराज्यासाठी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ल्यापासून १५ किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे. इथे एक किल्ला होता. तो स्वराज्यात आला आणि स्वराज्याची राजधानी म्हणून सजला. त्यानंतर कोंढाणा, पुरंदर, रोहिडा असे बारा मावळातील किल्ल्यामागून किल्ले स्वराज्यात आले. जावळीवर विजय मिळवला रायरीचा प्रचंड किल्लाही स्वराज्यात आला. त्याचे नाव रायगड ठेवले तर त्याच्या जवळच भोरप्या डोंगरावर प्रतापगड बांधला. स्वराज्याची घोडदौड सुरू होती कारण मावळे आपले रक्त आटवीत होते. मराठा सरदारच या घोडदौडीत आडवे येत होते पण शिवरायांच्या बुद्धीचातुर्याने आणि मावळ्यांच्या साथीने त्यांचा बंदोबस्त केला गेला.
स्वराज्यावर पहिले संकट अफजलखानाच्या रुपाने आले. तो स्वराज्य मातीमोल करण्यासाठी आला होता पण शिवरायांनी त्याचा कोथळाच बाहेर काढला. एकवेळ शिवरायांना वाटले की, आपले काही खरे नाही. पण ते डगमगले नाहीत. भेटीच्या वेळी शामियान्यात अफजलखानाकडून दगा फटका झाला. कृष्णाजी भास्करला ठार केल्यानंतर बडा सय्यद आला. त्याचा वार अंगावर झेलत जिवा महालाने सय्यदला जागच्या जागी ठार केले. त्यावेळी जिवा नसता तर स्वराज्याचा खेळ केव्हाच संपुष्टात आला असता. या संघर्षात संभाजी कावजी यांनी मोठा पराक्रम केला. खानाच्या फौजेची मावळ्यांनी दाणादाण उडविली. अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्यानंतर पन्हाळगड घेतल्यावर तर आदिलशहा भयंकर चिडला. स्वराज्याचा निःपात करण्यासाठी मोठी फौज घेऊन चालून आला. पन्हाळगडाला वेढा पडला. शिवराय यातून शिताफीने निसटले पण शिवा काशीदने शिवरायांसाठी स्वराज्यासाठी स्वबलिदान दिले. यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत झुंज दिली आणि घोडखिंड ही पावनखिंड केली. त्यांच्यासोबतच्या मावळ्यांनीही शौर्याची शर्थ केली. तगडी झुंज दिली. पुढे शायिस्ताखानाने पुरंदरला वेढा दिला पण भीमथडी तट्टावर बसणाऱ्या चपळ आणि काटक मावळ्यांनी आपल्या गनिमी काव्याने शायिस्ताखानाच्या सैन्याला हैराण केले. त्याने वेढा उठवला तरी तो पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसला. निवडक मावळ्यांच्या साथीने त्याची तीन बोटे छाटून मुघल सत्तेला पहिला तडाखा शिवरायांनी दिला.
शायिस्ताखानाची खोड मोडल्यानंतर मावळ्यांनी सुरत लुटली. त्यामुळे बादशहा प्रचंड चिडला. त्याने स्वराज्य नष्ट करण्यासाठी त्याने मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवले. पुरंदरला मुघलांचा वेढा पडला. दिलेरखानाने उघड उघड युद्ध पुकारले. याप्रसंगी मुरारबाजी देशपांडे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. कोणत्याही आमिषाला बळी मुरारबाजींनी निकराची झुंज दिली. मिर्झा राजे जयसिंगाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला गेला पण शेवटी पुरंदरचा तह झाला. या तहानुसार गफलतीने राजेंना नजरकैदेत ठेवण्यात आले. आग्र्याहून यशस्वी सुटका झाली. यावेळी हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर यांनी महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. उदयभान हे एक स्वराज्यावरचे मोठे संकट होते. लग्न असतांनाही कोंढाणा किल्ला घेण्यासाठी आणि उदयभानाचा निःपात करण्यासाठी तानाजीने आपले सर्वस्व पणाला लावले. सुर्याजीने गड जिंकून घेतला पण सिंह गेला. यावेळीही मावळ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली. स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न या नरवीर मावळ्यांनी पूर्णत्वास नेले. महार, मांग, रामोशी, वडार, सुतार, लोहार, साळी, माळी, कोळी, तेली आदी अठरापगड जाती आणि बलुतेदारांतील मावळे राजेंच्या सैन्यात होते. एवढेच नव्हे तर महाराजांच्या नौसेनेची धुरा दर्यासारंग या मुस्लीम सरदाराच्या हाती होती. दर्यासारंग यांनी इंग्रज नौसेनेला अनेकवेळा पराभवाची चव दाखवत आपल्या शौर्याने स्वराज्य वाढीस हातभार लावला होता.
शिवराय नौसेनेत बहुसंख्य सिद्दी मुस्लीम आणि मच्छिमार लोक होते. महाराज हे सरकार आपली सेना प्रगतशील बनवत होते. महाराजांच्या शस्त्रागारातील बहुसंख्य सैनिक हे मुस्लीम धर्मातले होते. शिवरा यांनी गुप्तहेर खात्याच्या मदतीला अनेक मोहिमांमध्ये यश संपादन केले होते. गुप्तहेर प्रकरणांचे सचिव हे मुस्लीमलाना हैदर अली हे होते. अफसर भेटीस जाताना शिवाजी महाराजांनी तीन अंगरक्षकांना आपले संरक्षण दिले होते. वाघाखे सुद्धा रुस्तमे जमाने यांनी शिवराला बनवून दिली होती. तसेच सिद्दी हिलाल, दर्यासारंग, दौलत खान, काझी हैदर, सिद्दी वाहव, नूरखान बेग, श्यामाद खान, हसन खान मियानी, सुलतान खान, दाऊद खान, दाऊद खान यांसारखे लष्करी मुस्लीम सरदार होते. शिवराके आणि मावळले सैन्यात कोणतीही जात आणि धर्मभेद मानला नाही.
स्वतःच्या शेतीतील पिकांच्या देवालाही हात लावण्याची सक्ती ताकीद मावळत होती. आले बहिणींची आबरु अधिकारी धाडेच महाराजांनी दिले. राज्य कसे लोककल्याणकारी पाहिजे वस्तुपाठच अनेकवेळा महाराजांनी आणि जिजाऊंनी याचा फायदा दिला. स्वराज्यातील सर्व नियम, कायदा कायदे सर्ववळले ते शिरसावंत महिला. म्हणून आपल्या माणसांचे स्वराज्य निर्माण झाले. अनेक ज्ञात अमूल्य अमूल्य आहे, हे नाकारता नाही. शिवरायांचा संबंध इतिहास आजच्या तमाम भारतीयांना जगाचा आदर्शच आहे. तेव्हा जातिंत आणि धर्मांत उठसूठ या ना त्याढ्यांनी किंवा विद्वेष निर्माण होणार नाही याची काळजी नाही कारण मराठी मुलंखाने जास्त पाहिजे. मराठी स्वराज्य व्हावे ही मावळ्यांची इच्छा होती म्हणून आपण सर्वांनी हा महाराष्ट्र सतत प्रदेशशील रहा, सर्वचजण सुखी होवो अशी अपेक्षा काय आहे?
- प्रज्ञाधर ढवळे , नांदेड
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .