प्रत्येकाने वृक्षारोपण कार्यात सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार  ( गोपाल गावित ) :

वृक्षारोपण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने या कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. 


जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील प्रांगणात जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेची इमारत, जिल्हास्तरावर सुरू असलेल्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम व परिसरातील वृक्षारोपण पाहून श्रीमती मनीषा खत्री यांनी समाधान व्यक्त केले. 


परिसरातील उंच टेकड्यावर देखील वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वृक्षारोपण ही काळाची गरज असून, प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण केले पाहिजे. जेथे जेथे शक्य असेल तिथे तिथे वृक्षारोपण करून वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डाएटचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी श्रीमती मनीषा खत्री मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. प्रवीण चव्हाण, श्री. रमेश चौधरी अधिव्याख्याता, डॉ. राजेंद्र महाजन,  डॉ. वनमाला पवार, डॉ. संदीप मुळे, श्री. पंढरीनाथ जाधव, श्री. सुभाष वसावे, विषय सहायक श्री.देवेंद्र बोरसे, श्री. गोविंद वाडीले, श्रीमती रेखा तांबोळी, श्री. युजवेंद्र देवरे आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)