राष्ट्रीय समुहगान आज देशभरात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

आज 17 ऑगस्ट 2022. सकाळी 11 वाजता संपूर्ण देश काही क्षणासाठी थबकला! हो! त्याला कारणही तसंच होतं. ते कारण म्हणजे " आजादीचा अमृत महोत्सव" साऱ्या देशाने आज आपल्या आजादीचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासी यांना आव्हान केलं आणि प्रत्येक राज्यांनी आज आजादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत राष्ट्रीय समूह गान कार्यक्रमात भाग घेतला. 


आज आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय गीत जाऊन आपला सार्थ अभिमान देशाबद्दलचा आदर व्यक्त केला. मुंबईतील अंधेरी येथील हंसराज बालाजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये सुद्धा आज मोठ्यां उत्साहाने समुहगान कार्यक्रमसाजरा केला. विद्यार्थी व शिक्षकांनी राष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमात सहभागी झाले. देशाबद्दलचा हा आदरभाव, सन्मान केवळ आजादी का अमृत महोत्सवाच्या काळातच नाही तर सतत रहावा अशी आशा सर्वांनीच व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)