जिल्ह्यातील 125 शाळांमध्ये बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम होणार | Child Marriage Eradication Public Awareness

शालेयवृत्त सेवा
0

 


शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या हस्ते झाले उदघाटन !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्याबाबत जाणीव आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महिला व बाल विकास विभाग युनिसेफ आणि एसबीसी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील एकशे पंचवीस जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थी व सहा लाख बालकापर्यंत बालविवाह निर्मूलनाचा संदेश पोहोचणार आहे.


या कार्यक्रमाचे सुरुवात नांदेड येथून झाली असून जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील महिला व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण करून त्यांच्या मार्फत मोफत कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 


याबाबत नुकतेच दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सजिता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिलिंद वाघमारे , एसबीसी मुंबईच्या संस्थापक सीमा कोणाळे , स्मिता फुलझले , प्रकल्प समन्वयक दिना सायमुल यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम 94 महिला व स्वयंसेविका व सामाजिक संस्थेचे पर्यवेक्षक यांच्या सहभागी राहणे राबविण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)