मिलिंद जाधव यांच्या 'गावगंध ' काव्यसंग्रहास अक्षरोदय साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दरवर्षी महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य प्रकाराला नांदेडच्या अक्षरोदय साहित्य मंडळाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते.भोकरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक - कवी व चित्रकार मिलिंद जाधव यांच्या  गावगंध या काव्यसंग्रहास मंडळाचा अक्षरोदय साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  


हा पुरस्कार  २७ मार्च २०२२ रोजी पीपल्स कॉलेज नांदेड परिसरात स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका मंगला फुलारी , उद्घाटक ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम , प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे व मंडळाचे राज्याध्यक्ष मारुती मुंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


 या पुरस्कार वितरण सोहळ्याचे व कविसंमेलनाचे नियोजन मंडळाचे राज्य सदस्य पंकज कांबळे , विनय कोंडा , आशिष कुमार आठवले व सदानंद सपकाळे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)