शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड साधणार शिक्षकांशी संवाद..

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक आणि मुख्याध्यापकांना नाव नोंदणी करणे बंधनकारक !


मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड,  राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी  ४.३० वा. संवाद साधणार आहेत.


सदर बैठकीस मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग , मा. विशाल सोळंकी, आयुक्त ( शिक्षण), महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालक, अध्यक्ष, राज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.


सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक , मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी

 https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1-d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944 


या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. सदर नाव नोंदणी लिंक दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.प्रत्येक शिक्षक ,मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करणे अनिवार्य असेल व प्रत्येकास नोंदणीनंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच उपस्थिती नोंदवली जाईल.


तरी राज्यातील इ. १० वी व इ.१२वीस अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक , मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे असे 

विकास गरड , उपसंचालक (समन्वय) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)