भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ करिता पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रासह सहायक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्याकडे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत  पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असणाऱ्या परंतू शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच भाडे तत्त्वावर राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील प्रवेशित मुलां-मुलीप्रमाणे भोजन भत्ता, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. 


या योजनेअंतर्गत नियमानुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति वर्षी 60 हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट शासनामार्फत जमा करण्यात येते. तरी पात्र विद्यार्थ्यांनी  स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रासह ३१ जानेवारी २०२२ पर्यंत  पाठवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



२८ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. 

( दि. ३ जानेवारी २०२२ चे पत्र )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)